नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आईएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा संघानं इजिप्तमध्ये कैरो इथं आयोजित केलेल्या विश्व चषक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. २५ मिटर पिस्तुल स्पर्धेत राही सरनोबत, ईशा सिंह आणि रिदम सांगवान यांच्या संघानं सिंगापूर वर १७-१३ अशी मात केली.

या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं पदक आहे. याआधी मिश्र संघ स्पर्धेत  श्रीयांका सदांगी आणि अखिल श्यौराण यांनी ५० मिटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारतानं आतापर्यंत ३ सुवर्ण पदकांसह ५ पदकं जिंकली असून, पदक तालिकेत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.