नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनमधे लष्करी कारवाई सुरु केल्यापासून युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ऑपरेशन गंगा अंतर्गत ९० विमानफेऱ्यांद्वारे या सर्वांना परत आणलं. या मोहिमेत हवाई दलांच्या विमानांचाही समावेश होता, अशी माहिती त्यांनी दिली. या कामी विविध मंत्रालयांनी उत्तम समन्वय राखला. स्वत: प्रधानमंत्र्यांनी युक्रेनमधल्या स्थितीचा आढावा घेतला आणि तिथ अडकलेल्या भारतीयांसाठी त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या अध्यक्षांशी अनेकदा संवाद साधला, असं त्यांनी सांगितलं.