पुणे : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट देऊन पहाणी केली. नांदेड सिटीमधील जे.पी.नगरमध्ये जाऊनही त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

सणसनगर भागातील पुराच्या पाण्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी राम यांनी भातशेती, दगडाच्या ताली, खराब झालेल्या रस्त्यांचीही पहाणी केली. अपदग्रस्तांना नियमानुसार मदत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.