मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.

महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबन या शिकवणीचे स्मरण देते. गांधीजींनी जीवनात वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेला अतिशय महत्त्व दिले. त्यामुळे स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण तसेच दिन-दुबळ्यांची सेवा आदी परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन करीत आहे, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.