मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १३७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७६ हजार ४१ झाली आहे. या संसर्गानं काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ८३० एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १०८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २७ हजार ५५१ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ६६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.