नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई उड्डाण क्षेत्र अधिकाधिक खुलं आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातलं असायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलं आहे.  सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि सचिवांची बैठक आज दिल्लीत होत आहे. त्यात ते बोलत होते.

देशातल्या छोट्या शहरांमध्ये विमानतळ आणि विमानप्रवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असून उडान योजने अंतर्गत देशभरात ७० नवे विमानतळ बांधण्यात आले असून, त्याचा लाभ आतापर्यंत एक कोटी प्रवाशांनी घेतला आहे, अशी माहिती सिंदिया यांनी दिली.