नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित अनेक संदर्भांवर भारतानं आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत असा पुनरुच्चार भारतानं यावेळी केला. भारत सातत्यानं चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर संदर्भात चिंता आणि निषेध व्यक्त करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.