नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य विधानसभेत कर्नाटकची जमिन इतर राज्यांना देणार नसल्याचा ठराव मांडणार असल्याचं सांगितलं, हा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला.

महाराष्ट्रात राज्य सरकारने असा ठराव केला तर विरोधी पक्ष पाठिंबा देईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कर्नाटकात असलेली महाराष्ट्राची एकेक इंच भूमी महाराष्ट्रात आली पाहिजे, त्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा करून ठराव मंजूर करू, असं त्यांनी सांगितलं.