नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत होणं शक्य नाही असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल ते नवी दिल्लीत प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. दहशतवादासंबंधी पाकिस्तानचं काहीही ऐकून घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.