मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत, अंतिम अधिकृत सूचना जारी होईपर्यंत नवीन नावं न वापरण्याचे निर्देश देण्यात आले असूनही काही शासकीय विभाग नवीन नावाचा वापर करत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं, त्यानंतर न्यायालयानं हे निर्देश दिले.