नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं परवानगी दिली.

मात्र, संबंधितांना या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी न्यायालयानं आपल्या या आदेशाला येत्या अठरा तारखेपर्यंत स्थगितीही दिली आहे.