राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत बाठीया आयोगाच्या अहवालाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं आज स्वीकारल्या, आणि त्या नुसार निवडणुका घेण्याचा आदेश...

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं...

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याची संरक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या जागतिक परिस्थितीतली आव्हानं लक्षात घेता संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज पुण्याजवळ खडकवासला...

सप्तश्रृगी देवीचं मंदीर घटस्थापनेपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर २६ सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून पासून खुलं करण्यात येणार आहे. मंदिराच्या दुरुस्तीसाठी हे मंदिर गेल्या महिनाभरापासून बंद ठेवण्यात आलं होतं....

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्ह सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड, या चिन्हांचा समावेश आहे....

तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई : पारलिंगी (तृतीयपंथी) समुदायातील व्यक्तींचा मतदार यादीत समावेश व्हावा यासाठी भारत निवडणूक आयोग वचनबद्ध असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे. आपला समाज एलजीबीटीआयक्यू समुदायाला समजून घेत...

प्रत्येकानं देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भव्य आणि दृढ संकल्प करा- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७५ वा स्वातंत्र्यदिन काल सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा झाला. देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. नवी दिल्लीत लाल...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका...

कोळशा अभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी – माधव भांडारी

मुंबई (वृत्तसंस्था) : वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी आणि सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी काल केला. राज्यातील...

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध पौर्णिमा हा, ज्यांनी मानवतेला विचार आणि कृतीत अभिजाततेकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं,...