पिंपरी : शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी पवनामाईचे पूजन केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दररोज करण्याचा आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला. त्यामुळे पाच महिन्यांपासून सुरु असलेली पाणीकपात रद्द झाली असून शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्तूयान पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत असून पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.