नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या.

शुभमन गील २८, तर चेतेश्वर पुजारा सात धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावात संपुष्टात आला.

जसप्रित बुमराहनं चार, रविचंद्रन अश्विननं तीन, मोहम्मद सिराजनं दोन, तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला.