नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केलं आहे.

या कायद्यातल्या तरतूदी सरकार निदर्शनं करणा-यांना समजावून सांगेल, त्यामुळे कायद्याबाबतच्या सगळ्या शंका दूर होतील, तसंच कायद्याची भीतीही कमी होईल, असंही प्रसाद म्हणाले.