नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघाची लढत यजमान ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. सकाळी सव्वा आठ वाजता हा सामना सुरु झाला आहे.

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करायचा निर्णय घेतला. मात्र पहिला बळी झटपट मिळवून भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला दबावाखाली ठेवलं आहे. पहिल्या तीन सामन्यात आलेल्या अपयशानंतर शनिवारी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला सात गडी राखून नमवलं.

हरमनप्रीत कौरच्या नेत्तृत्त्वाखाली भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आधीचे सराव सामने म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे.