नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या  दहशतवादी हल्ल्याच्या पुर्नचौकशीची मागणी करुन भाजप शहीदांचा अपमान करत आहे असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आज म्हटलं आहे. ते कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

‘लेट मी इट से नाऊ’  या माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर भाजपाच्या अतुल भातखळकर यांना या हल्ल्याच्या पुनचौकशी मागणी केली, त्यावर ते प्रतिक्रिया देत होते.

२६/११ चा दहशतवादी हल्ला भगवा आतंकवाद ठरवण्याचा लष्कर तोयबा या दहशतवादी संघटनेने प्रयत्न केला होता, असं मारिया यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.