नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना बोलत होते.

विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याची अधिक प्रगती करतांना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकासकामे करायला बांधील असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.