नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाणार रिफायनरीचा विषय आता संपला असून शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पुन्हा आणू देणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या कात्रादेवी इथं पक्षाच्या सभेत बोलत होते.

खासदार विनायक राऊत आणि  उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. रिफायनरीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं  राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

जिल्हा परिषद सदस्य  मंदा शिवलकर यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान प्रकल्पाच्या समर्थनासाठी उद्या जनकल्याण प्रतिष्ठाननं  डोंगर तिठा इथं सभा आयोजित केली आहे.