नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातलं सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार असून त्यासाठी जनतेनं सूचना कराव्यात असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात त्यांनी हे आवाहन केलं आहे. आपल्या समाज माध्यमावरील खात्याद्वारे या सूचना करता येतील असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.