नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिरूपती इथल्या श्री वेंकटेश्वरा पशुवैद्यकीय विद्यापीठात नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय कृषी विद्यापीठ क्रीडास्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं उल्लेखनीय कामगिरी केली.

मुलींच्या संघानं टेबल टेनिस आणि खो-खोमध्ये कांस्य आणि सुवर्णपदक पटकावलं. मुलांच्या संघानं बास्केटबॉल, व्हॉलिबॉल आणि कबड्डीमध्ये रौप्य, सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावलं. शिल्पा सांगळे हिनं ४०० मीटर धावण्याच्या आणि लांब उडी प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.