नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या भारतीय  यात्रेकरूंची तपासणीची प्रक्रिया सुरु झाली असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी इराणच्या प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

इराणमधल्या  भारतीय मच्छीमारांपैकी कुणालाही कोरोना विषाणूची लागण झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणमध्ये कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.

कोरोनामुळे इराणमध्ये काल आणखी ४९ जणांचा मृत्यू झाल्याचं इराणच्या आरोग्य मंत्रालयाने घोषित केले आहे.