नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकास क्रिशन, पूजा राणी आणि सतिष कुमार यांच्यासह भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिक साठी पात्र ठरले आहेत.

जॉर्डन मध्ये अम्मान इथं सुरू असलेल्या आशिया-ओशिनीया ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेत, उपांत्यपूर्व फेरीत विकासनं पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात जपानच्या मुष्टियोद्ध्यावर, तर पूजा राणीनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात थायलंडच्या मुष्टियोद्ध्यावर मात केली.

पूजा ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदाच पात्र ठरली असून विकासची ही तिसरी खेप आहे. आशिषकुमार आणि बोर्गोहिन हे देखिल ऑलिंपिक पात्र ठरले आहेत.