नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणुची बाधा झालेले आणखी तीन नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी दिली आहे.

ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. हे तीन जण दिल्ली, जम्मू आणि उत्तरप्रदेशातले असल्याचं त्यांनी सांगितलं.

यामुळे आता देशभरात कोरोना विषाणुमुळे होणाऱ्या कोविड नाईनटीन या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४२ वर पोचली असल्याची माहितीही त्यांनी दिली.