नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज ईशान्य दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारावर चर्चा होणार आहे. राज्यसभेतल्या विरोधी सदस्यांनी केलेली ही मागणी संसदीय कारभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मान्य केली आहे.

राज्यसभेत आज सकाळच्या सत्रात दोन विधेयके मांडण्यात येणार असून त्यानंतर ही चर्चा सुरू होईल. या दोन विधेयकांमध्ये दिवाळखोरी कायद्यातल्या सुधारणेबाबत ही दोन विधेयकं असणार आहेत.