मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ३६५ दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहीजे असं मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते आज औरंगाबाद इथं मनसेच्या वतीनं आयोजित शिवजंयती कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्रात प्रत्येक सण हा तिथीनुसार साजरा होतो. महाराजांची जयंती सुद्धा महाराष्ट्रासाठी एक सण आहे आणि तो तिथिनुसार साजरा व्हायला पाहिजे असं ते म्हणाले.

राज्यावर कोरोना विषाणूची बाधा वाढत आहे. तेव्हा प्रत्येकानं काळजी घ्यावी असा सल्ला ही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.