नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सामने यंदा कमी अवधित उरकले जाण्याची शक्यता असल्याचं क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. जगभरातली कोविड-एकोणीस ची साथ पाहता हे सामने 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

त्यानंतरही सामने बंदिस्त मैदानात घेण्याचा विचार करण्यात येईल, असे ते म्हणाले. सुरक्षिततेलाच सर्वोच्च प्राधान्य असून, दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.