नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणु बाधितांची संख्या आता ३२४ झाली आहे. यातले ४१ परदेशी नागरिक आहेत.

आतापर्यंत २४ रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. आजाराला ४ जण बळी पडले आहेत.

देशातल्या विविध विमानतळांवर आजपर्यंत  परदेशातून आलेल्या १४ लाख ९० हजार प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.