नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कामधंद्यानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किंवा बसने जाण्याची घाई करु नये, आहेत तिथेच रहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

प्रवासात या आजाराच्या प्रसाराचा जास्त धोका असून आपल्या आयुष्याशी आणि कुटुंबाच्या भविष्याशी खेळ करु नये असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे.