मुंबई : शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव वैशाली सुळे, कक्ष अधिकारी सचिन इंगळे तसेच मंत्रालयात उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प वाहून शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.