नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मार्चला नियोजित राज्यसभेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली.

येत्या २६ तारखेला राज्यसभेच्या ५५ जागांसाठी निवडणूक होणार होती, त्यापैकी ३७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अन्य १८ जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीची तारीख नंतर घोषित केली जाणार आहे.

राज्यातल्या सातही उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.