नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी आपल्या मंत्रालयाशी संबधित ३५० हून अधिक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संकटाच्या या परिस्थितीत प्रसार माध्यमं आणि दळणवळण या अत्यावश्यक सेवा असून जनतेपर्यंत अचूक आणि खरी माहिती पोहोचावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी २४ तास सेवा देण्याचं आणि नेहमीपेक्षा अधिक काम करावं, असं आवाहन त्यांनी  केलं.