नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत ही बैठक झाली.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि लॉकडाऊनमुळे विस्थापित कामगार आणि परराज्यातले अडकलेले कामगार यांच्यासाठी तातडीच्या उपाययोजनांबद्दल यावेळी चर्चा झाली.