नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले असून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या ५ हजाराहून अधिक व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने आरोग्य क्षेत्रातल्या सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई ५ सरकारी रुग्णालये आणि संस्था आणि ७ खासगी लॅबच्या माध्यमातून दिवसाला २ हजार नमुन्यांची सुविधा उपलब्ध असल्याचे टोपे यांनी सांगितले.