नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनरेगा कामगारांना २१ दिवसांची मजुरी आगाऊ देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे सुमारे ८ कोटी मजुरांपुढं रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऐनसुगीच्या हंगामात अनेक शेतमजुरांनाही काम नाही. सद्यस्थितीत त्यांना मदतीचा हातदेण्याकरता तातडीनं उचल देण्याबाबत सरकारनं विचार करावा, असं त्यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.