नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र आटोकाट प्रयत्न सुरू असताना रायगड जिल्हा सामान्य रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात ते फिजिशियन म्हणून कार्यरत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ड्युटी लावल्याने त्यांनी घाबरून पळ काढला असल्याचे सांगितले जाते आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न झाला पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.