मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातल्या एकवीरादेवी मंदिरातला यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदिरही भाविकांच्या दर्शनासाठी बंद असल्यानं हा चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याचं मंदिर संस्थानच्या वतीनं आज जाहिर करण्यात आलं.

धुळे शहरातून ८ एप्रिल रोजी एकविरा देवीची पालखी सुध्दा निघणार नाही. कुळाचार वगैरे विधीही घरीच करण्याचे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आलं आहे.

कोल्हापूरच्या ज्योतिबाची चैत्र यात्राही यावर्षी रद्द करण्यात आली आहे. ही परंपरा तब्बल १२१ वर्षानंतर प्रथमच खंडित झाली आहे. याआधी  १८९९  मध्ये प्लेगच्या साथीमुळे छत्रपती शाहू महाराजांनी ही यात्रा रद्द केली होती.