नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देश-विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतील. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा 64 वा भाग आहे.

या कार्यक्रमासाठी जनतेनं आपल्या कल्पना आणि विचार मांडावेत असं प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात सुचवलं आहे. यासाठी 1800-11-7800 या क्रमांकावर फोन करून किंवा नमो अॅपद्वारे तसंच 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन 25 एप्रिल पर्यंत आपल्या कल्पना आणि विचार नोंदवू शकता.