नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशातल्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या संबंधीचा देशभरात चालू असलेल्या उपाययोजनांची माहिती ते यावेळी देण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या टाळेबंदीचा कालावधी उद्या संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते काय घोषणा करतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रासह इतर ६ राज्यांनी यापूर्वीच संचारबंदीचा कालावधी वाढविलेला आहे.