नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या 10 हजार 363 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे की आतापर्यंत 1 हजार 35 रुग्ण बरे झाले असून 339 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज १२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ४५५ वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांमध्ये मुंबई महानगरपालिका क्षेत्रातले ९२ , नवी मुंबईतल्या १३, ठाणे महापालिका क्षेत्रातल्या  १० तर वसई विरार मधल्या ५ आणि रायगडमधल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यातले २२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं  त्यांना घरी सोडण्यात आल्याचाही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात मृतांची संख्या १६० वर पोहोचली आहे. राज्यात काल ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात  ४ पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे.