नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोनाचे १००७ नवे रुग्ण आढळले तर २३ जणांचा मृत्यू झाला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की देशात कोरोना संसर्ग झालेल्याची संख्या आता १३ हजार ३८७ तर मृतांची संख्या ४३७ झाली आहे. १ हजार ७४९ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ३ हजार २०५ झाली आहे. राज्यात कालपासून ७ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत ६ तर पश्चिम बंगालमधे ३ रुग्ण मरण पावले. राज्यात आतापर्यंत १९४ मृत्यू झाले असून त्याखालोखाल मध्य प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.