नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळान आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव जय शहा यांनी दिली.

संपूर्ण जग कोरोना ग्रस्त असल्यामुळे आणि टाळेबंदीचा काळ अनिश्चित असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर आणि अन्य भागधारकां बरोबर चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ असही ते म्हणाले. या आधी ही स्पर्धा १५ एप्रिल पर्यंत पुढे ढकलली होती पण आता टाळेबंदीचा काळ एकवीस दिवस वाढवल्यामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे.