नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालन्यातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी औरंगाबादहून दररोज अप-डाऊन करतात. मात्र, औरंगाबाद जिल्हा हा कोरोना बाधित रुग्णांच्या लाल क्षेत्रात असल्यामुळे या अधिकाऱ्यांना कुठल्याच चेकपोस्टवरून जालना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, असे आदेश जालन्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिले आहेत.