मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य घरगुती वीजग्राहक आणि शेतकरी यांचं मार्च ते जून महिन्यात येणारं संपूर्ण वीज बिल माफ करावं, अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मागणीचं निवेदन त्यांनी सादर केलं आहे.

टाळेबंदी दरम्यान, बंद असणाऱ्या औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांचे वीज बिल पुढच्या तीन महिन्यासाठी स्थगित केलं आहे. मात्र, गरीब वीजग्राहक, शेतकरी आणि कामगार कुटूंब टाळेबंदी नंतरही वीज बिल भरू शकणार नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य, गरीब वीजग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.