नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास कामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन टाळेबंदीच्या काळात अकुशल मजुरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देता येईल. अशी सूचना रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रजी तोमर यांच्याकडे मांडली.

तोमर यांनी विविध राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांसोबत व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी राज्य सरकार तर्फे रोहयो आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी तोमर यांच्याशी संवाद साधतांना ही सूचना मांडली.