नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मुळे नांदेड जिल्ह्यातल्या सचखंड गुरूव्दारात पंजाब, हरियाणा आणि दिल्ली इथून आलेल्या ४०० शिख भावीकांच्या दुसऱ्या जत्थ्याची काल रात्री १३  बस मधून रवानगी करण्यात आली.

महिनाभरापासून अडीच ते तीन हजार शीख बांधव नांदेड मध्ये अडकले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीने टप्प्या टप्प्याने त्यांची घरी रवानगी केली जात आहे. आता पर्यत ७५० भाविकांना पाठवलं आहे.