नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे.

याबाबतची अधिसूचना गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं मागवण्याची मुदत येत्या  ३० जून पर्यंत वाढवण्यात आल्याचं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.