नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ चे ३ हजार ३२० नवे रुग्ण गेल्या २४ तासात आढळल्याने देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ हजार ६६२ झाली आहे. काल कोविड १९ मुळे ९५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात १ हजार ९८१ रुग्ण मरण पावले.

सध्या एकूण ३९ हजार ८३४ जणांवर उपचार सुरु असून १७ हजार ८४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २९ पूर्णांक ९१ शतांश टक्के झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.