नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संक्रमणाच्या दुपटीचा वेग गेल्या तीन दिवसांत कमी होऊन तो १३ पूर्णांक ९ दिवसांवर आल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे. गेल्या २४ तासांत देशातल्या एकूण १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, असं ते यावेळी म्हणाले.

आपल्या देशानं  दिवसाला कोरोना विषाणूच्या १ लाख चाचण्या करण्याची क्षमता विकसित केली असून कोबास ६८०० उपकरणाच्या मदतीनं २४ तासांत अंदाजे १२ शे नमुन्यांची दर्जेदार चाचणी करता येईल असं ते म्हणाले.