मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यातील प्रवाशी – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यामधील 45 हजार 302 मजुरांना घेऊन पुणे विभागातून 36 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 14, उत्तरप्रदेशसाठी 14, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 1, राजस्थानसाठी 3 व बिहारसाठी 3 अशा एकूण 36 रेल्वेगाडया 45 हजार 302 प्रवाशांना घेवून रवाना रवाना झाल्या आहेत. दि. 16 मे रोजी पुणे विभागातून उत्तरप्रदेशसाठी 2,राजस्थान व बिहारसाठी प्रत्येकी 1 अशा एकूण 4 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकूण 5650 प्रवाशी अपेक्षित आहेत.

यापैकी पुणे स्थानकावरून उत्तरप्रदेश, राजस्थान व बिहारसाठी प्रत्येकी एक रेल्वे 1400 प्रवाशांसह नियोजीत आहे. तर सातारा रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशसाठी 1450 प्रवाशांसह एक रेल्वेगाडी नियोजीत आहे. या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.